नमस्कार मंडळी,

मी आपला सुधीर वाघमोडे. माझ्या आयुष्याचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशासाठी नव्हता, तर तो प्रत्येक क्षणी समाजाशी जोडलेला होता.

लहानपणापासूनच मला लोकांमध्ये राहायला आवडायचं. कोणाला अडचण आली तर त्याच्या पाठीशी उभं राहणं, सोबत धावून जाणं ही माझी सवयच झाली. व्यवसायात पाऊल टाकलं आणि Corner Mobile या उपक्रमाची सुरुवात केली. आज हजारो लोक रोजगार मिळवून स्वतःचा संसार उभा करत आहेत, हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. पण त्याहून मोठा आनंद तेव्हा होतो जेव्हा मी पाहतो की समाजातील तरुणाई आत्मविश्वासाने पुढे चालली आहे.

माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला नेहमीच एक ताकदवान आधार मिळाला – माझी सहचारिणी, माझी पत्नी स्नेहल वाघमोडे. त्यांनी प्रत्येक पावलावर माझी खंबीर साथ दिली आणि मला पुढे जाण्याचं बळ दिलं. त्या स्वतः डॉक्टर असून रुग्णसेवेसाठी सतत कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावातून आणि धैर्यपूर्ण वृत्तीमुळे मला समाजकार्यात अधिक जोमाने झोकून देण्याची प्रेरणा मिळाली. आज मी इथवर आलो आहे, ते फक्त माझ्या कष्टांमुळे नाही, तर त्यांच्या सोबतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे.

माझं नेहमीचं स्वप्न आहे

“माझ्या भागातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, आनंदी आणि प्रगतीशील असावं.”

म्हणूनच आज मी राजकारणामध्ये पुढे आलो आहे. राजकारण हे माझ्यासाठी केवळ सत्ता किंवा मान नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे. मी स्वतःला नेता म्हणून नाही, तर आपला माणूस म्हणून पाहतो.

  • जो आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होईल,

  • जो आपल्या भागातील समस्या स्वतःच्या समस्यांसारख्या सोडवेल,

  • जो प्रत्येक नागरिकाला आपला मानेल.

माझा ठाम विश्वास आहे की

  • आपल्या तरुणांना योग्य दिशा आणि संधी दिली तर ते जग जिंकू शकतात.

  • आपल्या महिलांना योग्य आधार मिळाला तर त्या घर आणि समाज दोन्ही उभं करू शकतात.

  • आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान दिला तर आपली संस्कृती आणखी समृद्ध होईल.

  • आणि आपल्या सर्वांसाठी उत्तम सुविधा, रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षितता निर्माण झाली तर आपला परिसर आदर्श ठरेल.

आज मी तुमच्यासमोर उभा आहे

  • एक उमेदवार म्हणून नव्हे, तर एक भाऊ म्हणून.

  • तुमचा विश्वास, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद हाच माझा खरा खजिना आहे.

आपण सगळे मिळून आपल्या भागाला एक नवा चेहरा देऊ, ही माझी खात्री आहे.

आपल्या सेवेत

डॉ.स्नेहल आणि सुधीर वाघमोडे

जनतेसाठी, सेवेसाठी, विकासासाठी सदैव तत्पर.”

“तरुणाईचा उत्साह, समाजासाठी नवा विचार”

वचननामा

माझ्या भागातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबाचा एक सदस्य आहे. म्हणूनच राजकारण हे माझ्यासाठी सत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन नाही; तर आपल्या सर्वांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची, प्रत्येक घराघरापर्यंत सुख, सुरक्षितता आणि प्रगती पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी आहे.

आज मी आपल्या समोर माझा वचननामा ठेवत आहे.
ही वचने फक्त कागदावरचे शब्द नाहीत, तर माझ्या मनातून उमटलेली बांधिलकी आहेत. आजवरच्या माझ्या कार्यातून मी जे काही शिकलो आहे, त्यावर आणि आपल्या विश्वासावर उभं राहून, या प्रत्येक वचनाला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा मी निर्धार करीत आहे.

मला माहीत आहे की पुढची वाट सोपी नाही, पण आपल्या प्रेमाने, पाठिंब्याने आणि आशीर्वादाने मी ही प्रत्येक जबाबदारी पूर्ण करीन. आपल्या चेहऱ्यावर आनंद, मुलांच्या डोळ्यांत भविष्याची चमक आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हेच माझ्या आयुष्याचं खरं समाधान असेल.

माझा हा वचननामा म्हणजे तुमच्याशी केलेला प्रामाणिक करार आहे – जो मी पूर्णत्वास नेईन.”**

व्हिडिओ

सामाजिक कार्यक्रम व जनता भेटी

ब्लॉग